‘दीडदमडीच्या लोकांनी राज ठाकरेंवर टीका करू नये, देशपांडेंचा अमोल मिटकरी यांना टोला

 

“राष्ट्रवादी पक्षावर जातीयवादाचा आरोप कोण करतोय तर ज्यांनी महाराष्ट्रात दक्षिण भारतीय व उत्तर भारतीय हा द्वेष निर्माण करण्याचे महापातक करुन राष्ट्रद्रोह केला ती व्यक्ती! अशी टीका अनिल मिटकरी यांनी केली होती. आता मिटकरी यांनी राज ठाकरेंवर केलेल्या टीकेचा मनसेने सुद्धा चांगलाच समाचार घेतला होता.

दीडदमडीच्या लोकांनी राज ठाकरे यांच्याविशयी बोलू नये. त्यांची तेवढी लायकी नाही, अशी टीका संदीप देशपांडे यांनी केली आहे. ते मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलत होते. त्यामुळे येणाऱ्या दिवसात मनसे आणि राष्ट्रवादी पक्षातील वाद आणखी चिघळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे.

“राष्ट्रवादी नाव असणारा पक्ष महाराष्ट्रात अतिशय संकुचित आणि जातीपातीचं राजकारण करत आहे. मनसेला त्यांच्याकडून काही शिकायची गरज नाही. राज्यात जातीपातीचं विष पेरणारे हे लोक महाराष्ट्रद्रोही आहेत”, असं संदीप देशपांडे म्हणाले आहेत. आता मनसेच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस काय उत्तर देते हे पाहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: