सध्या गोविंदाच्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात गोविंदाच्या आरक्षणाचा मुद्दा मांडला. त्यावर आता विविध संघटना आणि विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी देखील सरकारच्या या निर्णयाविरोधात आक्रमक झाले आहेत. सरकारने निर्णय मागे घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
आता या सर्व पार्श्वभूमीवर युवककाँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. सरकारने दहिहंडीचा समावेश हा खेळात केला याबाबत काहीच आक्षेप नाही. मात्र गोविंदाना शासकीय नोकरीत आरक्षण देण्याचा निर्णय म्हणजे देश आणि राज्यातील बेरोजगारांची सरकारने केलेली चेष्टा असल्याचा घणाघात सत्यजीत तांबे यांनी केला आहे. हा निर्णय चुकीचा आहे, सरकारने या निर्णयाचा पुनर्विचार करावा आणि नोकरभरती सुरू करावी अशी मागणीत तांबे यांनी केली आहे.
तर दुसरीकडे अजित पवार यांनी देखील या निर्णयावरून राज्य सरकारवर चांगलाच निशणा साधला आहे. ऑलिम्पिंकमध्ये किंवा इतर खेळात जे खेळाडू सर्वोच्च कामगिरी करतात त्यांना त्यांची शैक्षणिक पात्रता पाहून त्यांना सरकारी नोकरीची संधी दिली जाते. त्या खेळाडूंच्या नोंदी ठेवणाऱ्या संघटना असतात. मात्र दहीहंडीची नोंद तुम्ही कशी ठेवणार असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.