सरकार दुसरा पेनड्राइव्ह घेऊन समोर येईल, संजय राऊतांचे फडणवीसांना प्रतिउत्तर

 

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपणानंतर राज्यातील राजकरण चांगलेच तापू लागले होते अशातच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपचये फेऱ्या सुरु झाल्या होत्या. अशातच आता फडणवीसांच्या पेनड्राइव्ह प्रकरणावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विरोधीपक्ष नेत्याचं कामच असतं आरोप करण्याचं, त्यामुळे ते चर्चेत राहतात. आरोप करुन ते सनसनाटी निर्माण करतात. कालही त्यांनी असाच आरोप केला असल्याचं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं.

दरम्यान, हे स्क्रिप्ट कोणी लिहिले आहे. यामध्ये कोण कोण सामील आहे, याच्या तळाशी सरकार नक्की जाईल आणि दुसरा पेनड्राइव्ह घेऊन समोर येईल असे राऊत यावेळी म्हणाले. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल राज्य सरकारवर पेनड्राइव्ह बॉम्ब फोडला आहे. त्यांनी काल केलेल्या आरोपांना संजय राऊत यांनी आज प्रत्युत्तर दिले.

गिरीष महाजनांविरोधात कुंभाड रचलं? असा आरोप विरोधी पक्षाकडून केला गेला. मात्र, महाराष्ट्र पोलीस असं कधी करत नाही. त्यांना चांगले प्रशिक्षण दिले जाते. राजकीय दबावाखाली ज्यांनी फोन टॅप केले त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. जर कुंभाड रचायचे असेल तर सीबाआय आणि ईडीकडे जावं लागले असा टोलाही राऊत यांनी यावेळी लगावला.

खोट्या कारवाया कशा कराव्यात, राजकीय नेत्यांना कसे अडकवावे, खोटे पुरावे कसे सादर करावेत हे सध्या केंद्रीय यंत्रणाचे काम सुरु आहे. महाराष्ट्र पोलिसांना त्यांच्याकडून प्रशिक्षण घ्यावे लागेल असे राऊत यावेळी म्हणाले. राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री अशा प्रकारचे प्रशिक्षण घेण्याची परवानगी देणार नाहीत असे राऊत यावेळी म्हणाले. तसेच भाजपचे सलीम जावेद कोणं? असा सवालही यावेळी राऊत यांनी केला.

Team Global News Marathi: