गणेशोत्सवाचा आनंद महागाईने हिरावून घेतला, खडसे यांचा थेट शिंदे गटाला टोला

 

कधीकाळी भाजपचे सहकारी राहिलेले आमदार एकनाथ खडसे यांनी पुन्हा शिंदे, फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. वाढत असलेल्या महागाईवरून त्यांनी जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेशोत्सव साजरा करण्याचे आव्हान केले. मात्र महागाईमुळे आनंद राहिला नाही, उत्साहही नाही असं खडसे यांनी म्हटलं आहे.

वाढत असलेल्या माहागाईवरून एकनाथ खडसे यांनी शिंदे, फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी गणेशोत्सव साजरा करण्याचे आव्हन केले. मात्र महागाईमुळे आनंदही राहलीला नाही आणि उत्साहही नाही. गणेशोत्सवासाठी लागणारे दही दूध आणि मोदकही महाग झाले आहेत. महागाईमुळे सर्वसामान्य हवालदील झाला आहे असा टोला एकनाथ खडसे यांनी लगावला आहे.

महागाईमुळे यंदा गणरायाचे आगमन झाल्यावर होणाऱ्या आनंदावर विरजण पडले आहे. महागाई वाढतच आहे, मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खडसे कुटुंबीयांनी गणरायाची विधीवत पूजा करत स्थापना केली. यावेळी एकनाथ खडसे यांच्यासह रक्षा खडसे, मंदाकिनी खडसे आणि कुटुंबीयांची उपस्थिती होती.

Team Global News Marathi: