केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुयमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेमुळे त्यांना अटक आणि ratri उशिरा जमीन मिळाला होता. मात्र राणेंच्या टीकेमुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले होते. त्यातच राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेवरून दोन दिवसांपूर्वी चालू असलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर पुन्हा जन आशीर्वाद यात्रा सुरु झाली असून, ही यात्रा आता रत्नागिरीत पोहोचली आहे. या यात्रेचा समारोप सिंधुदुर्गमध्ये होणार आहे.
यात्रे दरम्यान नारायण राणे यांनी रत्नागिरीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी भविष्यात शिवसेना-भाजपाची युती झाली तर आपली भूमिका काय असेल, असा प्रश्न नारायण राणे यांना विचारण्यात आला त्यावर राणेंनी “मी जर-तरच्या प्रश्नांना उत्तर देत नाही, पण युतीचा निर्णय झालाच तर पक्ष सांगेल ते मला मान्य असेल,” असे एका वाक्यात स्पष्ट उत्तर दिले.
राजकारणात काही सांगता येत नाही, कोणीच कोणाचा कायमचा मित्र नसतो आणि कोणाचा शत्रूही नसतो. असे यावेळी सांगून शिवसेनेवर खळबळजनक आरोप करणाऱ्या राणेंनी याबद्दलचे प्रश्न टाळले. मी काही गोष्टी कंसात बोलतो, त्याबाहेर बोलत नाही, असं म्हणत राणेंनी त्याबद्दल जास्त बोलण्यास नकार दिला. मात्र त्यापूर्वी चंद्रकांत पाटील यांनी येणाऱ्या भविष्यात सेनेबरोबर युतीचे संकेत दिले होते.