आजपासून राज्यातील सर्व शाळा सुरू, मात्र एखादा विद्यार्थी पॉझिटिव्ह आला तर

 

मुंबई | आजपासून राज्यातील सर्व शाळा सुरु करण्यात आल्या असून आहेत. शाळांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळून विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी. मुलांमध्ये थोडीही लक्षणे आढळल्यास चाचणी करून घ्यावी आणि एखादा विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आल्यास ज्या वर्गातील विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आला तो वर्ग बंद ठेवावा, अशी सूचना शिक्षण विभागाकडे करण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

सोमवारपासून राज्यातील अनेक जिह्यांतील शाळा सुरू होत असल्याबद्दल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना राजेश टोपे यांनी उत्तरे दिली. लोकल सर्कल कम्युनिटी प्लॅटफॉर्मनं एक सर्वेक्षण केलं असून या सर्वेक्षणात ६२ टक्के पालकांनी मुलांना शाळेत पाठवण्यास नकार दिल्याचं समोर आलं आहे.

यावर बोलताना राजेश टोपे म्हणाले की, पालकांनी काळजी करण्याचं कारण नसून जगभरातील शाळांचा अभ्यास करूनच राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, असाही शाळा सुरू करण्याचा हेतू असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे पालकांनी काळजी न करता नियम पाळावे असे आवाहनदेखील टोपे यांनी केले.

लोकांनी नियम पाळल्यास राज्यातील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येईल आणि राज्यात लागू केलेले निर्बंध मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून कमी करण्यात येतील, असेही टोपे यांनी स्पष्ट केले आहे. राज्यात लस घेणे सक्तीचे नाही, मात्र नागरिकांच्या आरोग्यासाठी लस घेणे त्यांना भाग पाडू, असे सांगत सध्या लता मंगेशकर यांची तब्येत स्थिर असल्याची माहिती देखील टोपे यांनी दिली.

 

Team Global News Marathi: