केंद्र सरकारने पारित केलेल्या नव्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी मागच्या दीड वर्षांपासून केंद्र सरकार विरोधात आंदोलन करत असून केंद्राने पारित केलेले कृषी कायदे रद्द करण्यात यावे अशी मागणी करत शेतकरी आंदोलक दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करत आहेत. त्यातच अनेक शेतकऱ्यांना आपल्या प्राणही गमवावा लागला आहे. मात्र दुसरीकडे काही मंत्री महोदय वादग्रस्त विधाने करून या शेतकर्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत आहेत.
अशातच आता आता हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केलेल्या एका विधानामुळे खळबळ उडाली असून, यावरून विरोधकांनी आक्रमक होत टीका केली आहे. शेतकऱ्यांना काठीचीच भाषा कळते, जशास तसे उत्तर द्या, असे आक्षेपार्ह वक्तव्य मनोहरलाल खट्टर यांनी केले आहे. ते रविवारी प्रसार माध्यमंही बोलताना त्यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे.
या विधानानंतर विरोधकांनी आक्षेप नोंदवत खट्टर सरकारवर निशाणा साधला आहे. तर संयुक्त किसान मोर्चानेही टीका करत या वक्तव्याचा निषेध नोंदवला आहे. मनोहर लाल खट्टर म्हणाले की, प्रत्येक भागात ५०० ते एक हजार कार्यकर्त्यांची फळी उभी करा. तेच शेतकऱ्यांना जशास तसे उत्तर देतील, असे खट्टर यांनी म्हटले आहे. लाठ्या-काठ्या उचला. आक्रमक शेतकऱ्यांना तुम्हीही त्याच भाषेत उत्तर द्या. शेतकऱ्यांना काठीचीच भाषा कळते. आम्हीही पाहून घेऊ. दोन-चार महिने कारागृहात राहून बाहेर आलात की तुम्हीही नेते व्हाल. जामिनाची काळजी करू नका, असे खट्टर यांनी म्हटले