मुंबई | शेतकऱ्यांना चिरडण्याचा प्रकार जालियनवाला बाग हत्याकांडासारखा आहे अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांनी केली आहे. पवार यांनी लखीमपूर नृशंस हत्याकांडावर भाष्य करण्यासाठी आज पत्रकार परिषद घेतली आहे. त्यामध्ये ते बोलत होते. या प्रकरणामुळे सर्व स्थरातून मोदी आणि योगी सरकर्व्हर टीका होताना दिसून येत आहे.
शरद पवार म्हणाले की, लखीमपूरची ही घटना म्हणजे एकप्रकारे जालियानवाला बाग हत्याकांडसारखीच घटना आहे. हे सरकार मुळातच संवेदनशील नाहीये. मात्र, लोक या सरकारला त्यांची जागा दाखवून देतील. अशी पवार यांनी केंद्र सरकार तसेच यूपी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
ज्याप्रकारे शांतीपूर्वक आपला हक्क बजावणाऱ्या शेतकऱ्यांवर जो हल्ला झाला त्यातून भारत सरकारची नितीमत्ता स्पष्टपणे दिसून येत आहे. मात्र तुम्ही सत्तेचा वापर शेतकऱ्यांची दडपशाही करण्याचा प्रयत्न करत आहात. मात्र तुम्ही यशस्वी होणार नाही. याचं उत्तर फक्त पंजाबमधील नव्हे तर संपूर्ण देशातील शेतकरी उत्तर देतील. असेही पवार म्हणाले आहेत.