तुझ्यात जीव रंगला मालिका घेणार लवकरच प्रेक्षकांचा निरोप

तुझ्यात जीव रंगला मालिका घेणार लवकरच प्रेक्षकांचा निरोप

‘झी’ मराठी वरील ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका लवकरच निरोप घेत असल्याचे समजत आहे. बऱ्याच वर्षांपासून घरा घरात चालणारी हि मालिका आता अखेर आपल्या लाडक्या प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेतील पात्र असलेल्या बरकत अर्थात अमोल नाईक याने आपल्या फेसबुक पोस्टवरून आपल्या चाहत्यांना दिलेली आहे.

अमोल नाईक पोस्ट मध्ये लिहिले आहे कि, ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेच्या शेवटच्या आठवड्याला आजपासून सुरुवात होतेय. गेली चार वर्ष आणि १२५० हून अधिक भागांनंतर आता थांबायची वेळ जवळ आलीये.

ह्या मालिकेशी संबंधीत प्रत्येकालाच ह्या मालिकेने खूप काही दिलंय! प्रत्येकासाठी ही मालिका स्पेशल आहे! आजपासून पुढचे सहा दिवस ह्या मालिकेच्या प्रवासातले काही क्षण शेअर करायचा प्रयत्न करेन! नक्की पहा, तुझ्यात जीव रंगलाचा शेवटचा आठवडा! सोम ते शनि सायं ६:३० वाजता, फक्त झी मराठीवर! असे लिहिले आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: