मुंबई | केंद्रीय मंत्री मंडळाच्या विस्तारात भाजपा खासदार प्रीतम मुंडे यांना स्थान न दिल्यामुळे नाराज असलेल्या मुंडे भगिनींनी काल मुंबईत कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करून आपल्या मनातील खडखड व्यक्त केली होती. तसेच नाव न घेता पंकजा मुंडे यांनी फडणवीसांना टोला लगावला होता. याच पार्श्वभूमीवर कधीकाळी भाजपचे खासदार राहिलेले आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे यांनी भाजपावर घणाघाती टीका केली होती.
भाजप बहुजन चेहरे वापरतो आणि नंतर बाजूला करतो. भाजप हा ओबीसी विरोधी पक्ष आहे आणि बहुजन विरोधीही हा पक्ष असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. त्यासोबतच महागाई विरोधात देशभरात काँग्रेसचं आंदोलन सुरु आहे. संघटनात्मक दृष्टीकोनातून बैठका सुरु असल्याचं पटोलेंनी सांगितलं.
तसेच खडसे प्रकरणात बोलताना पाटोळे म्हणाले की, एकनाथ खडसेंसारख्या माणसांना त्रास देण्यासाठी झोटिंग समिती हा एक फास होता का?, असा सवाल नाना पटोले यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस हे खोटं बोलणारे मुख्यमंत्री होते, असं म्हणत नाना पटोलेंनी फडणवीसांवर टीका केली होती.