फडणवीस आणि राज्यपाल भेटीवर कुणाल कमाराचे सूचक ट्विट

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या शिष्टमंडळाने काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची सकाळी लवकर जाऊन राजभवन येथे भेट घेतली होती. आता या भेटीवर कॉमेडियन स्टार कामराने खोचक ट्विट करून फडणवीसांना टोला लगावला आहे.
“तुम्हाला आपल्या आयुष्यात जर अनेक गोष्टींमध्ये अपयश येत असल्याचे वाटत असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की रोज पहाटे चार वाजता उठून देवेंद्र फडणवीस तयार होतात आणि राज्यपालांना फोन करुन विचारतात, मी पुन्हा येऊ का? अशा आशयाचे ट्विट कामराने केले आहे.

काल सकाळी कुणाल कामराने केलेल्या या ट्विटला ३००० हून अधिक जणांनी रिट्विट केले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेच्या संघर्षाच्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापनेचा दावा करत भल्या पहाटे राजभवनावर जाऊन मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती.

मात्र अजित पवारांनी अवघ्या काही दिवसांनंतर राजकीय घडामोडींमुळे आपला पाठिंबा काढून घेतला आणि फडणवीसांनी राजीनामा दिला. यामुळे सर्वात कमी कालावधीसाठी राज्याचा मुख्यमंत्री होण्याचा विक्रम त्यांच्या नावावर नोंदवला गेला होता. बराच राजकीय गोंधळ पहाटेच्या या शपथविधीवरुन निर्माण झाला होता. कुणाल कामराने त्याचाच संदर्भ देत फडणवीसांवर आता निशाणा साधला आहे.

Team Global News Marathi: