“प्रत्येकाचे मुखवटे उतरवल्याशिवाय मी राहणार नाही, माझे शब्द लिहून ठेवा”

 

मुंबई | शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यात सध्या आरोप प्रत्यारोप सुरु असून संजय राऊत यांनी आज आर्यन खानला एनसीबीच्या एसआयटीने क्लीनचिट दिल्यानंतर भाजप आणि किरीट सोमय्यांवर टीका केली आहे. या प्रकरणात बनाव केला गेला होता. आर्यन प्रकरणात जसा बनाव केला तसाच बनाव आमच्या प्रकरणात केला गेला आहे. आता तुमच्या प्रत्येकाचे मुखवटे उतरवल्याशिवाय मी राहणार नाही. माझे शब्द लिहून ठेवा. तसेच बाप-बेटे तुरुंगात जाणारच, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला आहे.

संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आर्यन खानचा ड्रग्स प्रकरणात काहीच संबंध नसल्याचे आता उघड झाले आहे. या प्रकरणाचे सत्यबाहेर आले आहे. त्या साडेतीन लोकांची नावे मी सांगितली तर ते अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करतील. त्यामुळे जसजसे ते आत जातील ते तुम्ही पाहात राहा. काही अधिकाऱ्यांना वाटतं केंद्रात आमचं सरकार आहे. ते भ्रमात आहेत. महाराष्ट्र सरकारच्या तपास यंत्रणांनाही राज्यात झालेल्या भ्रष्टाचार, खंडणीवर तपास करून आरोपींना अटक करण्याचा अधिकार आहे.

आर्यन खानला क्लीनचिट मिळाल्यानंत संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. आर्यन खान प्रकरणात एसआयटीनं सांगितलं की त्या मुलाकडे ड्रग्ज सापडलंच नाही. असा बनाव आमच्या प्रत्येकाच्या बाबतीत केला जात आहे आता हे उघड होईल. आता मी समोर आलोय. आत्तापर्यंत मी यात पडलो नव्हतो. आता मी सगळ्यांचे मुखवटे उतरवून त्यांना जेलमध्ये पाठवल्याशिवाय राहणार नाही. माझे शब्द लिहून ठेवा’, असे राऊत म्हणाले.

Team Global News Marathi: