एकनाथ शिंदे गटाला मिळाला ‘सुप्रीम कोर्टाचा दिलासा, शरद पवार म्हणाले की,

 

शिवसेना आणि शिंदे गटाचा वादावर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीसाठी नकार दिला असून निर्णय जैसे थेच ठेवण्याचे आदेश दिले आहे. तर,’ न्यायालयाने काय निकाल दिला आहे, अद्याप तो वाचला नाही, त्यामुळे यावर आताच बोलता येणार नाही’, असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. शहरातील वसंतराव नाईक महाविद्यालयात कार्यक्रम पार पडला. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य केलं.

शिंदे गटातील 16 आमदारांवर कारवाई करण्यासाठी शिवसेनेनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आज सुनावणी झाली आहे पण मी न्यायालयाचा निकाल वाचला नाही. त्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेवर बोलणं योग्य राहणार नाही ‘ असं म्हणत शरद पवार यांनी न्यायालयाच्या निकालावर बोलणे टाळले आहे.

तसेच ‘वसंतराव नाईक यांच्यासोबत काम केलं. माझ्या अंतकरणात दोन लोकांच्या आठवणी कोरल्या गेल्या आहेत, पण यशवंतराव चव्हाण आणि वसंतराव नाईक यांची आठवण आहे, असंही शरद पवार म्हणाले. ‘मला तिकीट देताना आमच्या जिल्ह्यातील नेते विरोध करत होते. 25- 26 वय असेल इतक्या लहान मुलाला तिकीट देऊ नका म्हणून वसंतराव नाईक यांच्याकडे गेले. तेव्हा वसंतराव नाईक म्हणाले, 288 जागा त्यातील किती निवडून येतील?

तर 180 किंवा 190 येतील. मग वसंतराव म्हणाले की, मग 80 ते 90 जागा पडतील तर त्यातील आणखी एक जागा पडेल म्हणून मला तिकीट दिलं आणि मी निवडून आलो आणि मला त्यावेळी राज्यमंत्रिपद दिलं, म्हणून वसंतराव यांचा मी उल्लेख करतो, असं म्हणत शरद पवारांनी वसंतरावांच्या आठवणींना उजाळा दिला.

Team Global News Marathi: