मुंबई | राजकीय नेत्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणात आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी माहिती समोर आली होती की, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा तब्बल 60 दिवस फोन टॅप करण्यात आला होता तर एकनाथ खडसे यांचा 67 दिवस फोन टॅप करण्यात आला होता.
त्याननंतर आता या नेत्यांचे फोन समाजविघातक घटक नावाखाली टॅप करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणावर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं, सर्वांना अॅन्टी सोशल एलिमेंट्स सांगून, सर्व खोटं सांगत फोन टॅप करण्यात आले. कुणाला ड्रग्ज पेडलर, कुणाला गँगस्टर म्हटलं गेलं. आमच्यावर नजर ठेवली जात होती.
नवं सरकार स्थापन करणअयाच्या संदर्भात आम्ही कोणासोबत बोलत आहोत हे त्यावेळी सुरू होतं. आमची प्रायव्हसी भंग झाली. एक पोलीस अधिकारी ज्यांच्याकडून निष्पक्ष काम करण्याची अपेक्षा करतो. ते एका राजकीय पक्ष आणि राजकीय नेत्याच्या प्रति प्रामाणिकपणा दाखवण्यासाठी हे करत आहे.
आता त्यांना केंद्र सरकार सुरक्षा पुरवत आहे. वाचा : राज ठाकरेंच्या सभेला मोठ्या प्रमाणात विरोध,औरंगाबादेत ‘राज’गर्जना होणार की नाही? संजय राऊत पुढे म्हणाले, एकनाथ खडसे, मी स्वत:, नाना पटोले… आमचे फोन नंबर तेच आहेत. पण आमच्या नावासमोर जे नाव टाकली आहेत त्यात कुणी ड्रग्ज पेडलर, कुणी गुंडांची टोळी चालवत आहे अशा प्रकारची नावं टाकून फोन टॅप करण्याची परवानगी रश्मी शुक्ला यांनी मागितली होती.