शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी खासदार नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधला आहे. एका बाईला चॅनलने इतका उचलून ठेवलं की टीव्ही पाहण्याचा कंटाळा यायला लागला, अशा शब्दात शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी नाव न घेता नवनीत राणा यांच्यावर टीका केली आहे. पाचोरा येथे शिवसंपर्क अभियानाच्या समारोप मेळावा प्रसंगी शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी टीका केली आहे.
टीव्ही चॅनल आणि वृत्तपत्रांवर देखील गुलाबराव पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान आता कार्यकर्त्यांना स्वतःलाच वृत्तपत्र वृत्तवाहिनी होऊन काम करावं लागेल असेही यावेळी गुलाबराव पाटील म्हणाले. राणा दाम्पत्य अमरावतीत दाखल, ठिकठिकाणी जंगी स्वागत 14 दिवस तुरुंगवास झाल्यानंतर राणा दाम्पत्य 36 दिवसांनी विदर्भात दाखल झालेत.
अमरावतीत आगमन होताच राणा दाम्पत्यांचं ठिकठिकाणी भव्य स्वागत करण्यात आले.. याशिवाय ठिकठिकाणी हनुमान चालीसा पठण देखील करण्यात आले. यानंतर राणा दाम्पत्य त्यांच्या अमरावतीतील गंगा सावित्री निवास्थानी पोहचल्यानंतर दाम्पत्याचा कार्यकर्त्यांकडून दुग्धभिषेक सोहळा पार पडला. यावेळी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा दोघांना सोबत बसवून दुग्धभिषेक करण्यात आला.राणा दाम्पत्य येथून नागरिकांच्या समस्या सोडविताना एक नवा संकल्प करून पुढील वाटचाल करणार असल्याचे राणा दाम्पत्यांनी सांगितलं आहे.
महाराष्ट्रात दाखल होताच राणा दाम्पत्याचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल खासदार नवनीत राणा यांनी म्हटलं, आम्ही 36 दिवसांनी परतलो आहोत. महाराष्ट्रात हनुमान चालिसा बोलण्यास इतका विरोध का होत आहे? दिल्लीत आम्ही हनुमान चालिसा पठण केलं, रॅली काढली त्यावेळी तिथे सुरक्षा व्यवस्था होती. इथे महाराष्ट्रात रामाचा विरोध, हनुमान चालिसाला इतका विरोध का होत आहे. आज शनिवार आहे. महाराष्ट्राला लागलेला शनी दूर झाली पाहिजे आणि त्यासाठी आज आम्ही हनुमान चालिसा पठण करत आहोत. तसेच आमदार रवी राणा यांनी म्हटलं, बजरंगबली यांचे आशीर्वाद घेण्यासाठी नागपुरातील प्राचीन मंदिरात आम्ही दर्शन घेणार आहोत असे त्यांनी यावेळी बोलून दाखविले होते.