बीड | सत्ता ही स्वतःची व कार्यकर्त्यांचे घरं भरण्यासाठी नसते तर ती जनसामान्यांच्या उद्धारासाठी असते. मात्र, बीड जिल्ह्यात सत्ताधार्यांना जनतेच्या प्रश्नाशी कसलंही सोयर सुतक न राहिल्यानेच नगरपंचायतीच्या निवडणूकीत भाजपाला मोठे यश मिळाले असा आरोप भाजपा नेत्या सचिव पंकजा मुंडे यांनी केला.
केज विधानसभा मतदार संघाच्या आ.नमिता अक्षय मुंदडा यांच्या वतीने गुरूवारी दुपारी आई या त्यांच्या निवासस्थानी बीड जिल्ह्यात नगरपंचायतीच्या निवडणूकीत निवडून आलेल्या भाजपाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून पंकजा मुंडे बोलत होत्या. यावेळी त्या उपस्थित नवनिर्वाचित सदस्यांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या/
पंकजा मुंडे म्हणाल्या की, बीड जिल्ह्यात सध्या विरोधकांबद्दल मी एक बोलते, मात्र ते उत्तर दुसरच देवून जे प्रश्न उपस्थितीत केले जात आहेत. त्याकडे दिशाभूल केली जात आहे. मात्र बीड जिल्ह्यातील जनता खुप हुशार आहे. ‘कोणाचा पतंग कुठ कापायचा?’ हे त्यांना बरोबर कळते असं नाव न घेता पालकमंत्री धनंजय मुंडे यांना टोला लगावला आहे.