दिवाळीच्या तोंडावर निर्बंध आणखी शिथिल होण्याची शक्यता ?

 

मुंबई | राज्यात कोरोना संसर्गाचा प्रभाव आणि रुग्णसंख्या कमी होत असल्यामुळे काही नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. तसेच दोन डोस घेतलेल्यांना रेल्वे प्रवासाची मुभा सुद्धा देण्यात आली आहे. आता त्या पाठोपाठ आणखी शिथिलता देण्याच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज एक मोठी बैठक होणार आहे. राज्यातल्या कोरोना उपाय सांगणाऱ्या टास्कफोर्ससोबत ही बैठक होणार आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रविवारी मद्यमांशी संवाद साधताना राज्यात कोरोना निर्बंध शिथिल करण्याचे संकेत दिले होते. पुढच्या काही दिवसात राज्यातल्या मॉल, दुकानं, हॉटेल्स याबाबत काही अटी नियम शिथिल होतील असे सरकारकडून संकेत मिळतायत, त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आज टास्कफोर्सच्या बोलवलेल्या बैठकीला महत्व प्राप्त झालंय.

सध्यस्थितीत व्यापारी दुकानं, बार, रेस्टॉरंट, मॉल्स यांना रात्री 10 वाजेपर्यंतच सुरु ठेवण्याची परवानगी आहे. हॉटेल्समध्येही 50 टक्के ग्राहकांनाच मुभा आहे. दसरा आता पार पडलाय आणि दिवाळी तोंडावर आहे. त्यामुळे सण उत्सवात लोक मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. त्यातच मुंबईत काल एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. ह्या सर्व पार्श्वभूमीवर दुकानं, बार, रेस्टॉरंट, मॉल्सच्या वेळेची मर्यादा वाढवली जाण्याची शक्यता आहे. त्याबाबतचा निर्णयही एक दोन दिवसातच सरकारी जारी करेल अशीही सूत्रांची माहिती आहे.

Team Global News Marathi: