राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून विरोधक सतत महाविकास आघाडीवर टीका करताना दिसून येत आहे. अशातच आता वाईनच्या सुपर मार्केटमधील निर्णयाबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून महाविकास आघाडीवर टीका होताना दिसून येत होती. विरोधकांकडून होणाऱ्या आरोपांसंदर्भात मंत्री आदित्य ठाकरे यांना विचारण्यात आले होते.
आदित्य ठाकरे म्हणाले की, मी उत्तर देणार नाही कारण ते सध्या प्रत्येक गोष्टीवर टीका करत असतात, अशी प्रतिकिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. तसेच यावेळी आदित्य ठाकरे यांनी टीईटी घोटाळ्याबाबत बोलण्यास नकार दिला होता. विशेष म्हणजे त्यांच्या आलिशान कारच्या पंक्चरबाबतच्या प्रश्नावर ते चांगलेच नाराज झाल्याचं यावेळी बघायला मिळाल.
नाशिकमध्ये एमटीडीसीच्या ग्रेप रिसोर्टवर ठाकरे यांची शुक्रवारी रात्री पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते. सावरपाडा शेंद्रीपाडाची परिस्थिती बघून ते चित्र बदलायाला पाहिजे असं ठरवलं, मुख्यमंत्री साहेबांनी देखील सांगितलं, असे आदित्य ठाकरे म्हणाले. गुलाबराव पाटील यांच्याशी बोललो, पुढील तीन महिन्यात 13 गावांत आपण पाणी देऊ शकू, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.