देवेंद्र फडणवीस मित्र आहे पण काहीही बोलतात – नाना पाटोले

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस माझे चांगले मित्र आहेत पण ते काहीही बोलतात, असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, ऑपरेशन लोटस वगैरै काहीही होणार नाही. भविष्यात भाजपा पक्ष नावालाही उरणार नाही, असा विश्वासाही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

दोन दिवसांपूर्वी फडणवीस यांनी सत्तांतरांचे संकेत देत फासा आम्हीच पलटणार, असे विधान केले होते. त्यांच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना पटोले यांनी वरील विधान करत टोला लगावला होता. “देवेंद्र फडणवीस हे माझे मित्र आहेत. पण ते काहीही बोलतात. राज्यात ऑपरेशन लोटस वगैरे काहीही होणार नाही. भविष्यात भाजप हा पक्ष उरणार नाही” असे ही त्यांनी बोलून दाखविले होते.

तसेच अमित शाहांच्या वक्तव्यावर बोलताना, “भाजपा आणि शिवसेनेत‌ काय बोलणं झाले हे मला माहिती नाही. शाह तब्बल एका वर्षांने बोलले आहेत. त्यांच्या बोलण्याला काही अर्थ आहे का?, असा सवाल करत शाहांच्या वक्तव्याची पटोले यांनी चांगलीच खिल्ली उडवली होती.

Team Global News Marathi: