खासदार नारायण राणे यांची २२ वर्ष मुख्यमंत्री पदाची स्वप्नं पाहण्यात गेली, आता विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना देखील तेच स्वप्न पडत आहे, आणि त्यांची पुढील कित्तेक वर्ष तसेच जातील असा टोला राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी लगावला आहे.
राणेसाहेब २२ वर्ष फासे पलटवण्याचं स्वप्न पाहत आहेत, त्यांना मुख्यमंत्री बनण्याची स्वप्नं पडत आहेत. त्यांना फासे पलटवता आलेच नाहीत, तीच देवेंद्र फडणवीस यांची अवस्था आहे. नारायण राणेंची २२ वर्ष मुख्यमंत्रिपदाची स्वप्न पाहण्यात गेली, आता देवेंद्र यांचीही जातील’ असा तिरकस निशाणा नवाब मलिक यांनी साधला.
तसेक ‘भाजप हा प्रॉपगंडा करणारी मशिन आहे. खोट्या प्रॉपगंड्याने कुठलंही सरकार पडत नाही, सत्य उघड होतं, आम्ही अशा प्रॉपगंड्याला घाबरत नाही’ असेही नवाब मलिक यांनी ठणकावून सांगितले. भाजपची कार्यपद्धती ही फुग्यासारखी आहे, एकदा हवा गेली की पुढे जात नाही. राज्यात भाजपचा फुगा फुटला, दिल्लीतही फुटणार आहे. चाकाने सरकार चालत नाही, विचारांनी चालतं. महाविकास आघाडी सरकार भक्कम आहे. असे नवाब मलिक म्हणाले.