“दानवे गुरुजींची बुद्धी भ्रष्ट, मोदींनाही बैल म्हणतात, मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा”

 

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बैल म्हटले, हा पंतप्रधानपदाचा अपमान आहे. त्यामुळे रावसाहेब दानवे यांची केंद्रीय मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, असे विधान शिवसेना नेते आणि खासदार विनायक राऊत यांनी केले. विनायक राऊत यांनी आज प्रसार माध्यमांशी बोलताना बोलताना आपली प्रतिक्रिया दिली होती.

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, भाजपच्या नेत्यांना सत्तेची मस्ती आली आहे. या मस्तीमध्ये भाजपच्या नेत्यांची विकृती दिसून येते. राजकीय नेत्याचा ‘सांड’ असा उल्लेख करणे दानवे गुरुजींची बुद्धी भ्रष्ट झाल्याचं लक्षण आहे. याची दखल नरेंद्र मोदी यांनी घ्यावी. मोदी यांना बैल म्हणणे म्हणजे त्यांचा अवमान करण्यासारखा आहे. त्यामुळे त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणीही विनायक राऊत यांनी केली.

तसेच शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर शेलक्या भाषेत टीका केली आहे. बाडगा असतो तो कोडगा असतो. शिवसेनेवर टीका करण्यासाठीच भाजपने बुजगावणे पुढे केले आहे, असा घणाघाती हल्ला विनायक राऊत यांनी चढवला आहे.

Team Global News Marathi: