नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून देशभरात सुमारे २.५ कोटी लोकांना एकाच दिवशी लसीचे डोस देण्यात आले होतं. मात्र यावर काँग्रेस पक्षाने आक्षेप घेत थेट मोदींवर टीका केली होती. आता या टीकेचा पंतप्रधान मोदी यांनी समाचार घेतला आहे. देशातील अडीच कोटी लोकांना एकाच दिवशी कोरोना प्रतिबंधक लसींचे डोस दिल्यानंतर रात्री १२ वाजल्यानंतर एका राजकीय पक्षाला त्याचा त्रास सुरू झाला. त्यांचा ताप वाढला आहे. याचं काही लॉजिक असू शकतं का? अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉँग्रेसवर केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे गोव्यातील आरोग्यसेवा कर्मचारी आणि कोविड लसीच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. पंतप्रधान म्हणाले, जेव्हा तुमच्या सांगण्यानंतर नागरिकांनी लस घेतली तेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत संवाद साधला का? मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे. कारण मी वैज्ञानिक किंवा डॉक्टर नाही. मी असं ऐकलं आहे की लस घेतल्यानंतर १०० पैकी एका व्यक्तीला त्रास होतो. जास्त ताप आल्यानंतर मानसिक संतुलनही बिघडतं असं डॉक्टर सांगतात. पण मला जाणून घ्यायचं आहे की, काल जेव्हा आरोग्य कर्मचाºयांनी अडीच कोटींपेक्षा जास्त लोकांना लसीचे डोस दिले आहेत.
त्यापैकी काहींना त्रास झाला हे मी ऐकले आहे. पण हे मी पहिल्यांदाच पाहात आहे की एकाच दिवशी अडीच कोटी लोकांना लसींचे डोस दिल्यावर एका राजकीय पक्षाचा ताप वाढला आहे. जेव्हा लोकांना आम्ही लस दिली तेव्हा त्यांना करोनाला रोखण्यासाठी ही लस देत असल्याचे सांगितले. लसीकरणानंतर तुम्हाला काही त्रास होऊ शकतो. लस घेतल्यानंतर मास्क घालणे, हात धुणे आणि अंतर राखणे हे सुरुच ठेवायचे आहे असे सुद्धा त्यांनी सांगितले होते.