राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्धा चांगलाच गाजत असताना आज खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी कोपर्डी येथे भेट दिली होती. यावेळी संभाजीराजे कोपर्डी घटनेवर बोलताना म्हणाले की, कोपर्डी घटने प्रकरणी सरकारनी कोर्टाकडे स्पेशल बेंचच्या माध्यमातून सहा महिन्यात निकाल द्यावा अशी मागणी करावी अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. पुण्यात आज छत्रपती संभाजी राजे यांनी बोलताना ही मागणी केली आहे.
मराठा आरक्षण प्रश्नावर आता छत्रपती संभाजीराजेंनी आता भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली आहे. आज ते कोपर्डीला जाऊन पीडित कुटुंबीयांची तसेच ग्रामस्थांची भेट घेणार आहेत. त्यानंतर औरंगाबादला (संभाजीनगर) जाऊन काकासाहेब शिंदे स्मारकाला भेट देणार आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण तापणार असेच दिसून येणार आहे.
संभाजीराजे पुण्यात बोलताना म्हणाले ,”कोपर्डी घटनेचा दोषींवर निकाल अजूनही अमलात आलेला नाही.चार वर्ष का लागली ? राज्य सरकार ने काय करावे या दृष्टीने माझा कोपर्डी दौरा आहे. २०१६ मध्ये घटना घडली. २०१७ मध्ये निकाल लागला.प्रकरण हायकोर्टात गेलं. दोषींना दोन वर्ष संधीचा कालावधी देखील संपला. पण पुढची कारवाई झाली नाही.राज्य सरकारला माझी विनंती आहे की त्यांनी स्पेशल बेंच चा माध्यमातून सहा महिन्यात निकाल द्यावा अशी मागणी उच्च न्यायालयाकडे करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.