भारतीय संविधानात संशोधन करण्याची गरज असल्याचे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नेतेमंडळी सतत करीत असतात असा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी केला होता. त्यांचे दुरुस्तीचे हे मनसुबे हणून पाडा असे वक्तव्य भाई जगताप यांनी केले आहे.
संघाच्या मनसुब्यांना काँग्रेसने सतत रस्त्यावर उतरून विरोध केला आहे. राज्यघटनेतील तरतुदीनुसार मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी राखीव करण्यात आलेला फंड केंद्रातील भाजप सरकारने वापरलाच नाही. हा निधी सुमारे ५० हजार कोटींच्या घरात आहे हे पैसा सत्ताधाऱ्यांच्या मालकीचे नाहीत असा टोला सुद्धा त्यांनी लगावला होता.
काँग्रेसनेच या देशामध्ये सर्वांना समान शिक्षणाचा अधिकार दिला. भाजप सरकारने केवळ जाती-धर्माचे राजकारण केले आहे. एखाद्या विशिष्ट समाजाला गोंजारून देश चालत नाही. देश चालवण्यासाठी समाजातील सर्व घटकांना एकत्र घेऊन चालावे लागते. काँग्रेसने मागील ७० वर्षांत वंचित घटकांना न्याय देण्याचे काम केले आहे, असे त्यांनी बोलून दाखविले होते.