सर्वसामान्य माणसाला आज राठोड यांचा राजीनामा हवा आहे – विनोद तावडे

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी राज्यातील वातावरण चांगले तापू लागले आहे. त्यात या प्रकरणी शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांचे नाव आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. मात्र राठोड यांच्यावर लावण्यात आलेले आरोप फेटाळले होते. त्यावर आता भाजपा नेते आणि माजी मंत्री विनोद तावडे यांनी भाष्य केले आहे.

सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील लोकांवर असे आरोप होतात. त्यावेळी नेतृत्वाने अतिशय संवेदनशीलपणे असायला हवं. कारण या गोष्टी लोकांच्या मनावर परिणाम करत असतात.असं असताना मुख्यमंत्री असतील किंवा पवार साहेब असतील अशा जबाबदार व्यक्तींकडून कारवाईची कृती सामान्य माणसाला अपेक्षित आहे असं तावडे यांनी बोलून दाखविले.

पुढे बोलताना तावडे म्हणाले की, आज सर्वसामान्य माणसाला संजय राठोड यांचा राजीनामा हवा आहे. कारण एका सर्वसामान्य मुलीचा जीव गेला आहे आणि तिच्या आत्महत्या प्रकरणात मंत्री महोदयांचे पहिल्या क्रमांकावर नाव आलं आहे. त्यामुळे लोकांच्या मतानुसार राठोड यां

Team Global News Marathi: