“येणारे येतीलच, पण पंतप्रधानपदाची खुर्ची तुमच्या नशिबी नाही हे नक्की”

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या मेळाव्यानिमित्त केलेल्या भाषणात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत ‘मी पुन्हा येईन’ या वक्तव्यावरुन टोले लगावले. यानंतर भाजप नेत्यांनी शरद पवार यांच्यावर पलटवार केला. यातच माजी कृषी राज्यमंत्री व रयत क्रांती संघटनेचे नेते आमदार सदाभाऊ खोत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून शरद पवार यांना प्रत्युत्तर दिले आहे.

संकट काळात राजकारण करायचे नसते. काही लोकांना ते जमत नाही. ते कुठेही राजकारण करतात. निवडणूक लागायच्या आधीच, निकाल लागायच्या आधीच मी पुन्हा येईन असे सांगत फिरत होते. पण आम्ही येऊ देतो का, अशी खोचक विचारणा करत शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या जखमेवर मीठ चोळले. या टीकेनंतर सदाभाऊ खोत यांनी ट्विटरच्या माध्यमातून शरद पवार यांना प्रत्युत्तर दिले आहे.

येणारे येतीलच पण पंतप्रधान पदाची खुर्ची आपल्या नशिबी येणार नाही हे मात्र नक्की, असे ट्विट सदाभाऊ खोत यांनी केले आहे. दुसरीकडे, भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनीही शरद पवार यांच्यावर पलटवार केला आहे. अतुल भातखळकर यांनी एक ट्विट केले असून, पवारसाहेब ज्याचा हात घट्ट धरतात….. त्याची हमखास विकेट जाते, हा इतिहास आहे, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.

Team Global News Marathi: