वीजबिलाच्या मुद्यावरून भारतीय जनता पक्षाने आघाडी सरकारला घेरण्याचा प्लॅन तयार केला आहे. सरकारच्या वीज कनेक्शन तोडीविरोधात आज भाजपा पक्ष संपूर्ण राज्यात टाळे ठोको आंदोलन करत आहे. महाविकास आघाडी सरकारचा ७२ लाख कनेक्शन तोडण्याचा निर्णय हा मोगलाई आहे. आधी १०० युनिट माफ करणार असं सांगितलं. लोकप्रिय घोषणा केली खरी पण पुढे काय झाल, फक्त वाहवा मिळवून वीज बिलात माफी देण्याची वेळ आली तेव्हा उर्जामंत्र्यांचा प्रस्ताव उपमुख्यमंत्र्यांनी फेटाळला.
ज्या शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झाले त्यांना आधीच काही मिळाल नाही तर मग ही लोक पैसे कसे भरणार. ७२ लाखांची वीज कनेक्शन तोडणार असेल तर याचा फटका कोट्यवधी लोकांना बसणार आहे, असे भाजपा चे म्हणणं आहे. म्हणून भाजप आज राज्यभर या निर्णयाविरोधात आंदोलन करत आहेत.