“आताची राष्ट्रवादी शरद पवारांच्या विचारांची राहिली नाही”, चित्रा वाघ यांची राष्ट्रवादीवर टीका |

 

राष्ट्रवादी सोडून भारतीय जनता पक्षाच्या गोटात सामील झालेल्या चित्राला वाघ यांनी आता थेट राष्ट्रवादीच्या नेत्यावर टीका केली आहे. सोलापूर जिल्हातील अकलूज नगर परिषद आणि नातेपुते नगर पंचायतसाठी गेल्या पाच दिवसांपासून सुरु असलेल्या ठिय्या आंदोलनात सहभागी होत चित्र वाघ यांनीं आघाडीवर जोरदार टीका केली होती.

जनतेच्या प्रश्नापासून पळ काढण्यासाठी सरकार दोन दिवसांचे अधिवेशन घेत आहे. जर पूर्ण वेळ अधिवेशन घेतले तर भाजप यांना फाडून खाईल याची भीती वाटत आहे, असा आरोप चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला आहे. त्याचबरोबर त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर देखील तोफ डागली.

तर पुढे आताची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या विचारांची राहिली नाही असा टोला लगावत भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. आपणही २० वर्षे राष्ट्रवादीत काम केले आहे. साहेबांच्या राष्ट्रवादीत काम केलं आहे. त्यामुळे ही साहेबांच्या विचारांची राष्ट्रवादी नाही हा माझा विश्वास आहे, असं वाघ म्हणाल्या.

साहेबांच्या राष्ट्रवादीत राजकीय अभिनिवेश बाजूला ठेऊन लोकांच्या प्रश्नाला न्याय मिळाला असता. आज शेकडो भगिनी कोरोनाच्या संकट काळातही आपल्या प्रश्नासाठी घरदार सोडून रस्त्यावर बसल्यात हे साहेबांनी होऊ दिले नसते. मात्र आज जे चालले आहे ते साहेबांच्या विचाराची राष्ट्रवादी असती तर झालं नसतं अशा शब्दात राष्ट्रवादीवर टीका करत चित्रा वाघ यांनी शरद पवार यांच्य़ावर मात्र विश्वास व्यक्त केला.

Team Global News Marathi: