नारायण राणे यांची छत्रपती संभाजी महाराज यांच्याबरोबर तुलना, आमदार वैभव नाईक म्हणतात की,

 

सिंधुदुर्ग | प्रमोद जठार यांनी २४ ऑगस्ट रोजी राज्य सरकारवर टीका केली होती. त्यावेळी प्रमोद जठार यांनी म्हटले होते की, छत्रपती संभाजी महाराजांना सुद्धा याच संगमेश्वरात अटक झाली होती आणि औरंगजेबाचे राज्य संपले. नारायण राणे हे सुद्धा छत्रपती संभाजी महाराज आहेत आणि ठाकरे सरकार हे औरंगजेबाचे राज्य आहे मात्र प्रमोद जठार यांचे हे वाक्य त्यांना अडचणीत आणताना दिसत आहे. त्यांच्या या विधानावर आता शिवसैनिक आक्रमक झाले आहे,

प्रमोद जठार यांनी नारायण राणे आणि छत्रपती संभाजी महाराज यांची तुलना केली होती. याविरोधात आता शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यावर बोलताना नाईक म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराज हे आमचे दैवत आहे. प्रमोद जठार यांनी त्यांची तुलना नारायण राणे यांच्याशी केली. त्यामुळे आमच्या भावना दुखावल्या असून आपण त्याविरोधात कणकवली पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. पोलीस योग्य ती कारवाई करतील असा विश्वास असल्याचे वैभव नाईक यांनी म्हटले.

तसेच जन आशीर्वाद यात्रेत नारायण राणे यांनी शिवसेनेवर टीका सुरुच ठेवल्यास शिवसेना यात्रेला विरोध करेल, अशा इशाराही वैभव नाईक यांनी दिला. शिवसेनेचा जन आशीर्वाद यात्रेला विरोध नाही. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर सातत्याने राणे यांच्याकडून टीका होत असल्याने आम्ही विरोध करत आहोत. अटक झाल्यामुळे आता नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला हवा. ती सिंधुदुर्गाची परंपरा आहे. सुरेश प्रभू आणि मधू दंडवते यांनी यापूर्वी अशाप्रकारे राजीनामे दिले होते, याकडे वैभव नाईक यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

Team Global News Marathi: