मुंबई | | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचा आरोप केला होता. या आरोपणानंतर विरोधकांनी सडकून टीका महाविकास आघाडीवर आणि संजय राऊत यांच्यावर केली होती तर दुसरीकडे या टीकेला उत्तर देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यात 10 मार्चनंतर सत्ताबदल होईल.
तेव्हा 10 मार्चला उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यावर आपले सरकार येईल, असा दावा केला होता. मात्र, माझा हा दावा नसल्याचे पाटील यांनी म्हंटल होत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज माध्यमाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्याच विधानावरून पलटी मारली होती.
यावेळी त्यांनी पुणे येथे महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना केलेल्या विधानाबाबत स्पष्टीकरण दिले. 10 मार्चला उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यावर आपले सरकार येईल, असे मी कार्यकर्त्यांना सांगितले. कार्यकर्त्यांचे मन राखण्यासाठी तसे बोलावे लागले. मात्र, मी असा दावा केलेला नाही, असे यावेळी पाटील यांनी सांगितले.