कारण, कंगनाच २०१४ पूर्वी आदित्य पांचोलीच्या ताब्यात होती या अभिनेत्याने लगावला टोला !

 

मुंबई | सतत वादग्रस्त विधानाने करून चर्चेत राहणारी अभिनेत्री कंगना रानौत हिने देशाच्या स्वातंत्राबद्दल वादग्रस्त विधान करून नवा वाद अंगावर ओढावून घेतला होता. एका मुलाखतीत ‘खरे स्वातंत्र्य हे २०१४ साली मिळाले’ असे भारताच्या स्वतंत्र्याविषयी वादग्रस्त विधान करत खळबळ उडवून दिली. त्यामुळे तिच्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे. आता कंगनावर एका अभिनेत्याने तिच्या विधानावरून निशाणा साधला आहे.

कंगनाप्रमाणे इतर बॉलिवूड कलाकारांशी पंगा घेण्यासाठी केआरके अर्थात कमाल खान सर्वांना परिचीत आहे. केआरकेने यावेळी थेट कंगनाशी पंगा घेतला आहे. त्याने ट्विट करून कंगनावर टीका केली. केआरकेने त्याच्या ट्विटमध्ये म्हटलं की, ‘कंगना देशाच्या स्वातंत्र्याचा संबंध तिच्या स्वातंत्र्याशी जोडते का ? कारण कंगना म्हणते की तिला २०१४ नंतर स्वातंत्र्य मिळाले! त्याआधी ती हृतिक रोशन आणि आदित्य पांचोलीच्या ताब्यात होती!’, असे ट्वीट करत केआरकेने कंगनाला ट्रोल केले आहे.

भारताला १९४७ साली मिळालेले स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नसून ती भीक होती, खरे स्वातंत्र्य हे २०१४ साली मिळाले असे वादग्रस्त वक्तव्य केले कंगनाने केलं होतं. तिच्या या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. कंगनाच्या या वक्तव्यावरुन भाजपाच्या नेत्यांकडूनही नाराजी व्यक्त केली जात आहे. तसेच तिला दिलेले राष्ट्रीय पुरस्कार तिच्याकडून परत घ्यावे, अशीही मागणी कऱण्यात येत आहे.

Team Global News Marathi: