Monday, July 4, 2022
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

“…पण पंजाब राज्यात भाजपचे संपूर्ण पानिपत का झाले?” संजय राऊतांचा सवाल

by Team Global News Marathi
March 13, 2022
in राजकारण
0
भाजपला १ वर्षात ७५० कोटींच्या देणग्या, तर शिवसेनेकडे लोकांची श्रीमंती – सामना
ADVERTISEMENT

 

मुंबई | पाच राज्यांच्या निवडणुकांत भाजपने चार राज्ये सहज जिंकली. त्यातले उत्तर प्रदेश जिंकल्याचा जल्लोष आजही सुरूच आहे. पण सीमेवरील पंजाब राज्यात भाजपचे संपूर्ण पानिपत का झाले? त्यावर कोणीच बोलत नाही. ‘आप’ने दिल्ली ते पंजाब हातपाय पसरले. गोव्यात ते शिरले. हे चित्र काय सांगते?, असा सवाल शिवसेना पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून
करण्यात आला आहे.

DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur
ADVERTISEMENT

काय लिहिले आहे सामना अग्रलेखात ?

ADVERTISEMENT

उत्तर प्रदेशसह पाच राज्यांतील निवडणुकांचे रणकंदन संपले आहे. पंजाब वगळता चार राज्यांत भारतीय जनता पक्ष पुन्हा सत्तेवर आला. त्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन करायलाच हवे. पाच राज्यांत उत्तर प्रदेश हे सगळय़ात मोठे व महत्त्वाचे राज्य. लोकसभेच्या 81 जागा या राज्यातून निवडून जातात. या राज्यावर भाजपने पुन्हा आपले वर्चस्व प्रस्थापित केले, पण समाजवादी पार्टी या वेळी 42 वरून 125 पर्यंत गेली व समाजवादी पार्टीचे शंभराच्या आसपास उमेदवार दोनशे ते पाचशे मतांच्या फरकाने पराभूत झाले.

उत्तर प्रदेशात लोकसभेच्या 18 जागा भाजपला यामुळे गमवाव्या लागतील हे आजच्या निकालावरून स्पष्ट झाले. प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशात मोदी, शहा यांच्यापेक्षा जास्त मेहनत केली, पण त्यांना जागा जिंकता आल्या नाहीत. काँग्रेसने पंधरा जागा जिंकल्या तरी भरपूर, असे सुरुवातीपासून बोलले गेले.’

ADVERTISEMENT

पुढे अग्रलेखात लिहिले आहे की, ‘प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशच्या मैदानात थोडे आधीच उतरायला हवे होते. त्या खूप उशिरा आल्या, पण आज त्या जे प्रयत्न करीत आहेत त्याचा फायदा त्यांना 2024 सालात होईल. दिल्लीतील विजय सभेत पंतप्रधान मोदी यांनी जोरदार भाषण केले. 2024 च्या विजयाचा मार्ग या निकालांनी मोकळा केला असे ते म्हणाले. हे त्यांचे मत आहे. 2024 पर्यंत पुलाखालून बरेच पाणी वाहून जाईल. जेथे उद्या काय घडेल हे राजकारणात सांगता येत नाही, तेथे 2024 म्हणजे फार दूरची गोष्ट झाली,’ असा खोचक टोलाही सामना अग्रलेखातून लागण्यात आला आहे.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tech Drift Solutions Tech Drift Solutions Tech Drift Solutions
ADVERTISEMENT
Previous Post

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी फडणवीसांना खास सल्ला देत केलं मोठं वक्तव्य

Next Post

शरद पवारांचे नाव दाऊदशी जोडल्याप्रकरणी नितेश आणि निलेश राणेंवर गुन्हा दाखल

Next Post
शरद पवारांचे नाव दाऊदशी जोडल्याप्रकरणी नितेश आणि निलेश राणेंवर गुन्हा दाखल

शरद पवारांचे नाव दाऊदशी जोडल्याप्रकरणी नितेश आणि निलेश राणेंवर गुन्हा दाखल

Recent Posts

  • राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड
  • राज ठाकरेंच्या पत्रावर देवेंद्र फडणवीसांचं उत्तर; विधानसभेत पत्राचा केला विशेष उल्लेख
  • ‘शरद पवार बोलतात त्याच्या उलटंच घडतं, आता हे सरकार अनेक दशकं चालणार’
  • “बेइमानांच्या मुलांना कोणी बायको देणार नाही” म्हणणारे आमदार बांगर शिंदे गटात सामील
  • दिशा पाठोपाठ आदित्य ठाकरेंवर भाळली ‘ही’ अभिनेत्री, पोस्ट सर्वत्र चर्चेत

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group