‘तर भाजपने महाराष्ट्रात रस्त्या रस्त्यावर फुगड्या घातल्या असत्या’

 

मुंबई |  उत्तर प्रदेशातल्या लखीमपूर खिरी या ठिकाणी घडलेल्या घटनेवरुन मोदी सरकारवर टीका होऊ लागली आहे. मोदी सरकार विरोधात देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. भाजपचे नेते तथा केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाने शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घातल्याचा प्रकार घडला. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. ‘जर महाराष्ट्रात असा प्रकार घडला असता तर भाजपने रस्त्या-रस्त्यावर फुगड्या घातल्या असत्या’, अशी टीका राऊतांनी केली आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी भाजपवर टीका करताना राऊत म्हणाले की, ‘ कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून चिरडण्यात आले. भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या मुलावर शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घातल्याचा आरोप आहे. ‘जर महाराष्ट्रात असा प्रकार घडला असता तर भाजपने रस्त्या-रस्त्यावर फुगड्या घातल्या असत्या’.

लखीमपूर खिरी या ठिकाणी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसह 8 जणांच्या अंगावर भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाने गाडी घातली असल्याचा असा शेतकऱ्यांनी केला आहे.

Team Global News Marathi: