बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू होण्याची शक्यता, मंगळवारी बैठकीचे आयोजन

 

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनीआदेश धुडकावून लावत बैलगाडा शर्यत पार पाडली. याप्रकरणी त्यांच्यासह जवळपास ४० बैलगाडा मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातच आता महाराष्ट्रात पुन्हा बैलगाडा शर्यती सुरू करण्यासंदर्भात आघाडी सरकारने हालचाली सुरू झाल्या आहेत. याबाबतचे संकेत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी शनिवारी सांगलीत दिले.

बैलगाडी शर्यतीला परवानगी देण्याच्या बाबतीत येत्या २४ ऑगस्ट रोजी पशुधन विकास मंत्र्यांबरोबर बैठक होणार आहे. या बैठकीत मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असं त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रशासनाचा आदेश धुडकावत बैलगाडी शर्यत घेतली होती. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

पाटील म्हणले की, बैलगाडा शर्यतीबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवर बंदी घातलेली आहे, हे माहीत असताना शर्यत घेणं बरोबर नाही. न्यायायालय याबाबत जाब विचारु शकतो. सांगली जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीबाबत लवकरच जिल्ह्यातल्या नेते, कार्यकर्त्यांशी बोलू. तसेच सहकारात राजकारण नसावे ही आपली भावना आहे, असेही त्यांनी स्पष्ट केलं.

लोकमताचा आदर करता करता आपण मतांचा आदर जास्त करू लागलो आहे. मात्र ही मानसिकता बदलण्याची गरज आहे. एखाद्या पोलिसांना काम केले नाही तर त्याची बदली केली जाते. जर एखाद्या इंजिनीयरने बांधकामाला परमिशन दिली नाही की आपण त्याला मदत करण्या ऐवजी आपण ते करून घेतो. हे बदलण्याची गरज आहे. मोहनजेदारो जशी संस्कृती होती तशीच संस्कृती कृष्णा काठची आहे. ही संस्कृती कायम राखायची असेल तर आपण राजकीय गोष्टी बाजूला ठेवून काम करायला हवे. कृष्णामाई, वारणेच्या पाण्यावर आपले जीवन अवलंबून आहे. या नद्यांनीच आपल्याला घडवले. ती कृष्णामाई आपल्यावर का नाराज होते याचा विचार करण्याची गरज आहे, असेही पाटील म्हणाले.

Team Global News Marathi: