भाजपची काळी जादू चालणार नाही, पुन्हा नाना पटोले यांनी साधला निशाणा

 

 

राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्ष पॅड स्वीकारल्यानंतर राज्यातील विरोधक आणि केंद्रातील मोदी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. अशातच आता पुन्हा एकदा पटोले यांनी निशाणा साधला आहे. ‘भाजपच्या हातून सत्ता गेल्यानंतर भाजपची काळी नजर महाविकास आघाडी सरकारवर आहे. मात्र भाजपची काळी जादू चालणार नसून हे सरकार 5 वर्ष पूर्ण करेल, असं म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नांना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला.

नाना पटोले आज भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी आयोजित सायकल परेड कार्यक्रमात दरम्यान बोलत होते. ‘सरकार राष्ट्रावादी चालवत असून काँग्रेस -शिवसेना बघाची भूमिका घेत असल्याच्या आरोप केला जात आहे, पण मुळात भाजपची पहाटे आलेले सरकार गेल्याने भाजपची तडफडत होत आहे’ अशी टीका नाना पटोले यांनी भाजपवर केली.

तसंच, आम्ही सत्तेत भागीदारी असून कॉमन मिनिमम प्रोग्रामवर सरकार काम करत आहे. ह्याच्या त्रास विरोधकास होत असून त्यांची काळी नजर आहे. त्यामुळे भाजप ची काळी जादू चालणार नसून ही सत्ता ५ वर्ष चालेल, असंही नाना पटोले यांनी विरोधकांना ठणकावून सांगितलं आहे.

Team Global News Marathi: