राज्यात औरंगाबादचे संभाजी नगर करण्याच्या मुद्यवरून राजकारण चांगलेच तापू लागले होते. त्यात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेने अध्यक्ष राज ठाकरे यांनी नामांतराच्या मुद्यावरून शिवसेना आणि भाजपाला चिमटा काढला आहे. ते आज पत्रकार माध्यमांशी बोलत होते.
भाजपा आणि शिवसेना सत्तेत असताना त्यांनी औरंगाबादचं नाव बदललं नाही. तेव्हा यांना कुणी रोखलं होतं? आज कसलं राजकारण करत आहात? असा प्रश्न विचारतानाच राज ठाकरे यांनी भाजप आणि शिवसेनेवर हल्ला चढवला.
केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार असताना अनेक शहरांची नावं बदलली, दिल्लीच्या रस्त्यांनी नावं बदलली गेली. मग औरंगाबादचं संभाजीनगर का केलं नाही? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर संभाजीनगरचा विषय आणायचा आणि जनतेची फसवणूक करायची, हेच चालत आलं आहे. पण संभाजीनगरची जनता हुशार आहे. ती योग्य निर्णय घेईल आणि शिवसेना-भाजपचा योग्य समाचार घेईल, असा दावाही राज ठाकरे यांनी केला आहे.