राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी केलेले आरोप फेटाळून लावले. विरोधकांच्या असल्या आरोपांमुळे माझं कुठलेही राजकीय नुकसान होणार नाही, असं विधान मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत होतं. तर भाजपचं ऑपरेशन लोटस कधीच पुर्ण होणार नाही, असं देखील म्हटलं आहे. यावर आता भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी टीका केली आहे.
दर आठवड्याला सत्ताधारी महावसुली आघाडीतील तीन पक्षापैकी कोण ना कोण येतो आणि एकच वाक्य बोलत रहातो, ‘ॲापरेशन लोटस होणारं नाही’. आता हेच वाक्य उदय सामंत म्हणत आहेत. खरतर हे सरकार स्वतःच्या अंतर्गत विरोधातूनच जाणार आहे, अशी टीका भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. भाजपने ॲापरेशनचा कधीच दावा केला नाही तरी एवढी धास्ती का?, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
उदय सामंत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उदय सामंत यांनी निलेश राणे यांच्यावर नाव न घेता परखड टीका केली आहे. त्यात त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा माझ्यावर प्रचंड विश्वास आहे. त्यामुळे विरोधकांच्या असल्या आरोपांमुळे माझे कुठलेही राजकीय नुकसान होणार नाही, असं देखील म्हटलं होतं. तर देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली पण ती गुप्तपणे झाली नाही. तर २०० माणसांसमोर भेट झाली, असं देखील सावंत म्हणाले होते.