मुंबई | राज्यात मागच्या काही दिवसांपासून ड्रग्स प्रकरण चांगलेच गाजले असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलेच शीतयुद्ध पेटलेले दिसून येत आहे. तसेच राज्यात गेल्या काही दिवसांपासून ड्रग्जप्रकरण चांगलेच चर्चेत आणि वादात आहे. त्यात, एनसीबी अधिकाऱ्यांच्या कारवाईमुळे ईडीनंतर आता एनसीबी ही तपास यंत्रणाही चर्चेचा विषय बनली आहे.
काही दिवसांपूर्वी श्रीनगरहून मुंबईत ड्रग्ज आणणाऱ्या एका टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला होता. त्यानंतर, आता मुंबई एनसीबी पथकाने १५०० किलो गांजा जप्त केला आहे. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथे ही कारवाई करण्यात आली. याकारवाईमुळे पुन्हा एकदा अमली पदार्थाचे प्रकरण राज्यात चांगलेच चर्चेत आले आहे.
एनसीबीच्या पथकाला खबऱ्याकडून टीप मिळाल्यानंतर पोलिसांनी ट्रकमधून वाहतूक करणाऱ्यात येत असलेला गांजा पकडला आहे. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून तब्बल १५०० किलोचा गांजा जप्त करण्यात आला आहे. आंध्र प्रदेशच्या विखाशापट्टणम येथून हा गांजा विक्रीसाठी महाराष्ट्रात आणण्यात आला होता. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच, त्यांनी धाड टाकून गांजाची पोती ताब्यात घेतली आहेत.