मोठी बातमी | महाराष्ट्रात शर्यतीवरील बंदी हटण्याची शक्यता ?

बैलगाडा शर्यत सुरू करण्याची मागणी बैलगाडा शर्यत प्रेमींकडून तसेच अनेक राजिक्य पक्षाकडून वारंवार होत आहे. मात्र मुंबई हायकोर्टाने बैलगाडा शर्यतीवर बंदी घातली होती. त्यानंतर या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. महाराष्ट्र सरकारच्या या याचिकेवर सुनावणी करण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली आहे. येत्या सोमवारी या संदर्भात सुनावणी होणार आहे.

महाराष्ट्रातील संपूर्ण ग्रामीण भागातील बैलगाडा प्रेमींचे लक्ष या सुनावणीकडे लागलेले आहे. तमिळनाडूमधील ‘जल्लिकट्टू’ या बैलांच्या खेळाप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व ग्रामीण भागांत बैलगाडी-बैलगाडा शर्यती होण्याचा मार्ग मोकळा व्हावा, यासाठी राज्य सरकारने कायद्यात सुधारणा करून त्याविषयीच्या नियमांचा मसूदा तयार केला आहे.

तसेचराज्यातील विविध भागांत दिवाळी दरम्यान बैलगाडा शर्यतीचं आयोजन मोठ्या प्रमाणात करण्यात येत असतं. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने शर्यतींवरील बंदी पुढच्या काही आठवड्यांसाठी कायम ठेवल्याने यंदाच्या दिवाळी दरम्यान राज्यात शर्यती होऊ शकल्या नव्हत्या. आता सर्वोच्च न्यायालय या बंदीवर काय प्रतिक्रिया देतं आणि ही बंदी उठवली जाते का? आणि पुन्हा बैलगाडा शर्यतीचा धुरळा उडणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Team Global News Marathi: