Big Breaking- महाराष्ट्रात लॉकडाऊन 31 मेपर्यंत वाढवला

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्याची मुदत 17 मे रोजी संपत आहे. पण, कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊनचा चौथा टप्पा घोषित करण्यात आला आहे. हा टप्पा 31 मे 2020च्या मध्यरात्रीपर्यंत राहणार आहे.

राज्यसरकार तर्फे एक परिपत्रक जाहीर करण्यात आलं असून त्यात कोरोना विषाणूला रोखण्यासाठी लॉकडाऊन वाढवत असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. तूर्तास लॉकडाऊनमधील सद्यपरिस्थितीतील नियम, बंधने, बंधनांतील शिथीलता तशीच पुढे सुरू राहणार असून त्यात झालेले बदल वेळोवेळी सूचित केले जातील, असंही नमूद करण्यात आलं आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: