‘भुंकणाऱ्या कुत्र्यांची तोंड बंद करा’, अबू आझमींची राज ठाकरेंवर टीका

 

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या औरंगाबाद येथील सभेत मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावर आपली भूमिका मांडली आहे.त्यांनी 4 तारखेपासून मशिदींवरील भोंगे उतरले नाहीत तर मशिदींसमोर भोंगे लावून दुप्पट आवाजात हनुमान चालीसाचं पठण केलं जाईल, असा इशारा दिला आहे.

आता त्यांच्या या आव्हानावर समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आझमी यांनी सडकून टीका केली. राज ठाकरे यांनी आपल्या औरंगाबाद येथील भाषणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवारांवर हल्लाबोल केला होता. याच टीकेचा धागा पकडत अबू आझमी यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला.

त्यांनी राज्य सरकारने राज ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याती विनंती केली. अबू आझमी नेमकं काय म्हणाले? “शरद पवार यांच्या पायाखालच्या वाळूइतकी पण राज ठाकरेंची लायकी नाही. शरद पवार हे फक्त महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देशाचे एक ज्येष्ठ नेता आहेत. ते बडे नेते आहे.

त्यांना मी सांगेन की, अशा भुंकणाऱ्यांचे तोंड बंद करा. हे संविधानच्या विरोधात बोलतात. मशिदींवरील भोंग्यांना संविधानाने परवानगी दिली आहे, सु्प्रीम कोर्टाने मशिदींवर लाऊड स्पिकर लावण्यासाठी परवानगी दिली आहे तर हे आहेत तरी कोण अशाप्रकारची भाषा करणारे?”, असा सवाल अबू आझमींनी केला.

Team Global News Marathi: