सध्या राज्यात हिंदुत्वाच्या राजकारणाने पेट घेतला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये जोरदार सभा झाली. तसेच मुंबईत भाजपची बुस्टर सभा झाली. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला आहे. तर राज ठाकरे यांनी देखील औरंगाबाद येथे सभा गाजवली आहे. आता महाविकास आघाडीतील नेते याला काय प्रत्युत्तर देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
फडणवीस बोलताना म्हणाले, भोंगे उतरवायला ज्यांची हातभर फाटते, ते म्हणतात आम्ही बाबरी पाडली, काय विनोद आहे. बाबरी पाडल्याबद्दल ज्या 32 नेत्यांवर आरोपपत्र दाखल झाले त्यात तुमचा एक महाराष्ट्राचा नेता दाखवा अशी टीका फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे.
फडणवीस पुढे बोलताना म्हणाले, बाबरी पाडल्याच्या 32 आरोपींच्या यादीत लालकृष्ण अडवाणी, डॉ. मुरलीमनोहर जोशी, स्व. कल्याणसिंग, उमा भारती, विनय कटियार, साध्वी ऋतंभरा, महंत नृत्य गोपालदास, रामविलास वेदांती, जयभागसिंग पवैया, आचार्य धर्मेंद्र जी यांची नावे होती, असंही फडणवीस म्हणाले.