देशभारत वाढत असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांमध्ये लॉक डाऊन जाहीर करण्यात आलेला आहे, त्यात महाराष्ट्रात सुद्धा ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यामुळे अनेक सेलिब्रिटीनी विदेशात जाणे पसंत केले होते तसेच आज देशात निर्माण झालेल्या परिस्थितीवर भाष्य करणे टाळले होते. याच मुद्द्यावरून आता अनेकांनी सेलिब्रिटीवर जोरदार टीका केली होती. आता त्या पाठोपाठ राजदचे नेते तेजस्वी यादव चांगलेच भडकले आहेत.
परदेशातून भारतातील परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. विविध सेलिब्रिटी आणि नेत्यांनी याबद्दल मतं मांडली आहेत. याचाच संदर्भ देत राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी भारतातील सेलिब्रिटींच्या मौनावर संताप व्यक्त केला आहे. आज परिस्थिती बिकट होत असताना सेलिब्रिटीनी यावर मौन बाळगले आहे. याच मुद्द्यावरून तेजस्वी यादव यांनी ट्विट करत फटकारलं आहे.
“प्रिय भित्र्या भारतीय सेलिब्रिटींनो, थोडासा कणा दाखवा, थोडसं तरी बोला. तुमच्यासाठी पूज्य असलेल्या व्यक्तीच्या चुकीच्या प्राथमिकतांमुळे ऑक्सिजनसारख्या मुलभूत गोष्टीसाठी तुमचे देशबांधव एक दुसऱ्यांच्या जीवांसाठी प्रत्येक सेंकदाला मरत आहेत. तुमचा विवेक कुठे आहे. कुठे आहे तुमचा विकलेला आत्मा आणि ह्रदय? देशाशी प्रामाणिक रहा, सरकारशी नाही,” असं म्हणत तेजस्वी यादव यादव यांनी सेलिब्रिटींच्या मौनावर संताप व्यक्त केला आहे.
Dear coward Indian Celebrities,
Show some spine!Speak up!
You compatriots are dying every second for as basic a thing as oxygen supply due to misplaced priorities of your demigods.Where is your conscience?
Where is ur sold soul & heart?Be loyal to the country,not the regime!
— Tejashwi Yadav (@yadavtejashwi) April 24, 2021