मुंबई मनपाला आमच्या सर्व जागा लढवण्याची तयारी, भाई जगताप यांचे वक्तव्य

मुंबई मनपाला आमच्या सर्व जागा लढवण्याची तयारी, भाई जगताप यांचे वक्तव्य

मुंबई काँग्रेस अध्यक्ष पदावर काँग्रेस नेते भाई जगताप यांची पक्ष नेतृत्वांने मुंबई अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. येणाऱ्या मुंबई मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती अत्यंत महत्वाची मानली जात आहे. मात्र अध्यक्ष पदावर विराजमान होताच भाई जगताप यांनी मुंबई मनपाला सर्वच्या सर्व जागा लढवण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीला सेना,राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र वाढणार की स्वबळावर यावर आता सवाल उपस्थित झाला आहे.

भाई जगताप यांनी शुक्रवारी शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. बाळासाहेब यांच्या सर्व स्मृतिदिनाला मी नेहमी येतो, राजकारणाच्या पलिकडे काही व्यक्तींचं स्थान असतं, इथे प्रेरणा मिळते, आज आणि उद्या सर्व महान व्यक्तींच्या प्रेरणा स्थळावर जाणार असल्याचे भाई जगताप यांनी सांगितले.

मुंबई प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर भाई जगताप यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली होती. त्यावेळी महानगरपालिका निवडणूक एकत्र लढवण्यासंदर्भात चाचपणी झाल्याची चर्चा होती. मात्र, आता भाई जगताप यांनी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याचा इरादा जाहीर केला आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: