राज्यात भोंग्यांच्या मुद्द्यावरून भाजपा सोडून सर्व विरोधात मनसे पक्षावर तुटून पडले आहेत अशातच आता भोंग्याच्या राजकारणावरून राज ठाकरे यांचे अस्तित्व धोक्यात येईल असं काँग्रेस नेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात म्हणत होत आता थोरातांच्या या विधानावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंदकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे थोरातांनी आधी स्वतःच्या अस्तित्वाची चिंता करावी, राज ठाकरे यांची चिंता नसावी असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.
भारतीय जतनता पक्षाचा अजेंडा जरी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राबवला तरी आम्ही स्वागत करु असे देखील चंद्रकांत पाटील म्हणाले. राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी मिळाली नसती तरी सभा झाली असती. सध्या मनसेसोबत युती करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे पाटील यांनी सांगितले. कोल्हापूर-पुणे महामार्गावर अनेक कॅमेरे लावले आहेत. थोडा वेळ वाढला की लगेच दंड केला जातो. आताचा दंड देखील भरला आहे.
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, रस्ते चांगले झाले, मग नागरिकांनी गाड्या चांगल्या घेतल्या. आता त्याला स्पीड लिमिट लावलं जातं आहे. अशा दंडामुळे घरं दारं विकायची वेळ येईल, असे पाटील म्हणाले. राजद्रोह, देशद्रोह गुन्हा कशाही वेळी लावला जातो. मातोश्रीच्या समोर हनुमान चालीसा म्हणण्याचा संकल्प हा राजद्रोह कसा होऊ शकतो? असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.