बाळासाहेब ठाकरेंचा दाखला देत नितेश राणेंचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला

 

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि विरोधी पक्षनेते यांच्यातील वाद आता विकोपाला पोहचताना दिसून येत आहे. त्यातच १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींसोबत नवाब मलिक यांनी जमिनीचा व्यवहार केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. नवाब मलिक आणि त्यांचा मुलगा फराज मलिक यांनी हा व्यवहार मान्य केला असला तरी त्यातील अंडरवर्ल्डशी कनेक्शनचा आरोप फेटाळून आला आहे.

दरम्यान, फडणवीस यांनी केलेल्या आरोपाचा धागा पकडत भाजप आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. नितेश राणे यांनी ट्वीट करुन उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. ९३च्या दंगलीत बाळासाहेबांनी हिंदूंना वाचवलं. आता त्यांचाच मुलगा ९३ दंगलीच्या आरोपींचा पार्टनर असलेल्या मंत्र्यांबरोबर मांडीला मांडी लावून सत्ता उपभोगतोय. खरं तर आता बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर गोमूत्र शिंपडण्याची वेळ आली आहे. शिवसैनिक हे करणार का? नाहीतर मीच जाऊन शिंपडतो…’ असं ट्वीट करुन नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना जोरदार टोला लगावलाय.

नवाब मलिक यांनी आज देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. नवाब मलिक यांनी आज सकाळी १० वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला करताना पाच ते सहा वेळा मुन्ना यादवचं नाव घेतलं. मुन्ना यादवचं नाव घेऊन त्यांनी फडणवीसांवर हल्ला चढविण्याचा प्रयत्न केला.

त्याचबरोबर आमचा तुम्हाला सवाल आहे की रियाझ भाटी कोण आहे. 29 ऑक्टोबरला रियाझ भाटी बनावट पासपोर्ट सोबत सहार विमानतळावर पकडला गेला. दाऊद इब्राहिम संबंधाच्या बातम्या वृत्तपत्रात आल्या होत्या. रियाझ भाटी सर्व कार्यक्रमात तुमच्या सोबत का दिसत होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आरोप करायचा नाही. त्यांच्या कार्यक्रमात जायचं असल्यास तपासणी केल्याशिवाय परवानगी मिळत नाही. रियाझ भाटीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत फोटो काढले. रियाझ भाटीसोबत तुम्ही वसुलीचं काम केलं, असा आरोप नवाब मलिक यांनी केला.

Team Global News Marathi: