Friday, July 1, 2022
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘९३च्या दंगलीवेळी बाळासाहेबांनी मुंबई वाचवली, आज त्यांचाच मुलगा दंगलीतील आरोपींना वाचवतोय

by Team Global News Marathi
February 24, 2022
in मुंबई
0
अन बंद दाराआड चर्चेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलणं टाळलं
ADVERTISEMENT

मुंबई | राज्य सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीने केलेली कारवाई आणि नंतर त्यांना झालेली अटक यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. या कारवाईवरून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे.त्यातच सध्या ईडीच्या कोठडीत असलेल्या नवाब मलिक यांच्या बचावासाठी शिवसेना पुढे आल्याने भाजपा आमदार नितेश राणे यांनी थेट मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच टीकेचे लक्ष्य केले आहे.

DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur
ADVERTISEMENT

 

नवाब मलिक यांच्या अटकेविरोधात शिवसेनेकडून येत असलेल्या प्रतिक्रियांवर टीका करणारे ट्विट नितेश राणे यांनी केले आहे. त्यात नितेश राणे म्हणतात की, १९९३ च्या दंगलीनंतर मुंबई मा.बाळासाहेब ठाकरे यांनी वाचवली. आज त्यांचाच मुलगा मुख्यमंत्री असताना ९३च्या दंगलीतील आरोपींना वाचवत आहे. म्हणून आता भगव्याची जबाबदारी आमची!, असे विधान नितेश राणे यांनी या ट्विटमधून केले आहे.दरम्यान, नितेश राणेंनी नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ पुढे आलेल्या संजय राऊत यांच्यावरही टीका केली होती. जनाब संजय राऊत आमच्या मुंबईत १९९३ मध्ये झालेली साखळी बॉम्बस्फोटांची मालिका आपण सत्तेसाठी मुजरा करण्याच्या नादात विसरलेले दिसताहेत.

ADVERTISEMENT

या हल्ल्यात २५७ मुंबईकरांनी आपले प्राण गमावले होते आणि ७१३ मुंबईकर जबर जखमी झाले होते. या बॉम्बस्फोट मालिकेमध्ये दाऊद इब्राहीम सहभागी होता. हे तुमचे काँग्रेस सरकार सत्तेत असतानाच सिद्ध झाले होते. अशा देशद्रोह्यांसोबत भागिदारीचा आरोप नवाब मलिकांवर आहे. त्याचा सखोल तपास झाला पाहिजे, ही मागणी न करता तुम्ही मलिकांचा बचाव करण्यातच धन्यता मानत आहात. ही एक प्रकारची भारतमातेसोबत गद्दारी आहे. आता या पुढे आपण मुबंईला ‘आपली मुंबई’ म्हणू नका. कारण सत्तेसाठी आपण सगळं विसरलात, असा टोला नितेश राणे यांनी लगावला होता.

ADVERTISEMENT

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tech Drift Solutions Tech Drift Solutions Tech Drift Solutions
ADVERTISEMENT
Previous Post

गुजरातमध्ये खाणीतून काढलेला 60 लाख टन कोळसा रस्त्यातून गायब

Next Post

योगींच्या गडात आदित्य ठाकरें शिरणार, करत शिवसेना उमेदवारांचा प्रचार

Next Post
राज्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी आदित्य ठाकरेंचा प्लॅन

योगींच्या गडात आदित्य ठाकरें शिरणार, करत शिवसेना उमेदवारांचा प्रचार

Recent Posts

  • “पुजारी दुसऱ्याला केलं कारण आपल्याला देव व्हायचंय यालाच राजकारण म्हणतात”
  • बंडखोरीनंतर शिवसेनेत मोठ्या फेरबदलाची शक्यता
  • फडणवीसांनी अडीच वर्षांपूर्वीच मोठं मन दाखवायला हवं होतं
  • दोनशे बिहारी आणून.’, म्हणत कूकने अभिनेत्री माही विजला दिली धमकी
  • “फडणवीस हे एकनाथ शिंदेंचे उजवे हात, दोघांनी मिळून राज्य पुढे न्यावं”

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group