नवी दिल्ली | देशात महिलांवरील अत्याचाऱ्यांच्या प्रमाणात अधिक वाढ झालेली दिसून येत असून नवी दिल्लीतून एक धाकदायक माहिती समोर येत आहे. रोहिणी परिसरात असलेल्या बाबा वीरेंद्र देव दीक्षित यांच्या ‘अध्यात्मिक विश्व विद्यालया’मध्ये अल्पवयीन मुली, युवती आणि निराधार महिलांना चांगल्या व्यवस्थेचे आमिष दाखवून आश्रमात आणले जात होते. काही दिवसांनी त्यांच्यासोबत छेडछाड सुरू झाली. २० एप्रिल रोजी झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने दिल्लीतील गंभीर प्रकरणावर संताप व्यक्त केले आहे.
न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, आश्रमातील महिलांना प्राण्यांपेक्षाही वाईट परिस्थितीत ठेवण्यात आले होते. चोवीस तास कडक बंदोबस्त होता. कुणी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तरी त्याला एवढी मारहाण केली जाई की तो हतबल होत असे. महिलांना पडद्याशिवाय उघड्यावर आंघोळ करावी लागत होती. अशा अवस्थेत मुलींची परेडही केल्याचा आरोप आहे. 2018 मध्ये ही बाब उघड झाली होती. येथून सुमारे 40 महिलांची नरकयातनेतून सुटका करण्यात आली.
याचिकाकर्त्याची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील मनेका गुरुस्वामी यांनी उच्च न्यायालयाला सांगितले की, ‘पीडितेच्या पालकांना तिला भेटायचे आहे. मात्र आश्रमातील लोकांनी हे होऊ दिले नाही. या आश्रमाचा मुख्य आरोपी वीरेंद्र देव दीक्षित हा आरोपी आहे, ज्यांच्या विरोधात सीबीआयने आरोपपत्र दाखल केले आहे, या आरोपीविरुद्ध 10 खटले वेगवेगळ्या न्यायालयात प्रलंबित आहेत.’
आरोपी वीरेंद्र देव दीक्षित हा ब्रह्मकुमारी संस्थानशी संबंधित होता. या संस्थेकडून आश्रमाच्या कारभाराची माहिती घेतल्यानंतर अध्यात्म विद्यापीठ नावाने स्वतःची संस्था स्थापन केली होती. या कथित बाबाने दिल्लीतील रोहिणी भागात आपला भव्य आश्रम बांधला, जिथे 100 हून अधिक महिलांना डांबून त्यांना आश्रय देण्याच्या नावाखाली त्यांचा वापर केला गेला.