केवळ राजीनामा देऊन चालणार नाही , फौजदारी गुन्हा दाखल करा – आशिष शेलार

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी अखेर शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र फक्त राजीनामा दिला म्हणून चालणार नाही, याप्रकरणी पोलिसांनी फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.

आशिष शेलार यांनी मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना ही मागणी केली आहे. केवळ राठोड यांच्या राजीनाम्याने चालणार नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी करावीच लागेल. याप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करावे लागतील. तरच पूजा चव्हाणची हत्या झाली की आत्महत्या झाली हे समजेल. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी लागेल.

तसेच मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी राठोड यांच्यावर कारवाई करण्यात चालढकल का केली? असा सवाल शेलार यांनी केला आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर सखोल चौकशी केली जात आहे, असे सांगितले जात होते. पण कोणताही गुन्हा दाखल न करता पोलीस कशाच्या आधारावर चौकशी करत होते? कुणाची चौकशी करत होते? असा सवालही आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.

Team Global News Marathi: