छोट्या पडद्यावरील आई कुठे काय करते ही मालिका लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकारांवर प्रेक्षक अगदी मनापासून प्रेम करताना दिसतात. दिवसेंदिवस या कलाकारांची लोकप्रियता ही वाढतच चालली आहे. मालिका जरी अरुंधतीभोवती फिरत असली तर अनिरुद्ध, संजना या नकारत्मक भूमिका साकारणाऱ्या कलाकारांच्या अभिनयाचे तितकेच कौतुक होत असतं. मालिकेत अनिरुद्धची भूमिका मिलिंद गवळी साकारताना दिसतात. या भूमिकेमुळे मिलिंद यांना वेगळी ओळख व लोकप्रियता दिली.
मिलिंद गवळी नेहमीच सोशल मीडियावर मालिकेबद्दल असेल किंवा त्यांच्या भूमिकेबद्दल मत मांडत असतात. नुकतीच त्यांनी ग्रेट भेट म्हणत एक पोस्ट लिहित एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. मिलिंद गवळी यांची वडिलांसाठी पोस्ट मिलिंद गवळी यांनी व्हिडिओ पोस्ट करत म्हटलं आहे की, Great Bhet ” काल “आई कुठे काय करते” च्या सेटवर माझे वडील श्री श्रीराम गवळी आले होते ,त्यांच्याबरोबर श्री अरविंद वैद्य जे अनुपमा या सिरीयल मध्ये वडिलांचे काम करतात ते पण आले होते आणि सेटवर त्यांची भेट किशोरजी महाबोलें शी झाली, जे अनिरुद्ध च्या वडिलांचे काम करतात , या तिघांची जी भेट झाली आणि मला असं वाटलं, ही आहे ग्रेट भेट.
तिघही अतिशय तरुण ,उत्साही आणि हुशार अनूभवी , माझ्यासाठी हा कालचा दिवस खूप आनंददायी आणि छान गेला ,खूप गप्पा झाल्या ,जेवणं झाली,परत चहा झाले , सहकलाकार यांच्या भेटी झाल्या ,अरविंदजीं ना संजना चे कॅरेक्टर खूप आवडतं ,त्यामुळे त्यांच्या तिच्याशी @rupalibhosle खूप गप्पा झाल्या, आणि तिला भरभरून त्यांनी आशीर्वाद दिले , शंतनु मोघे चे वडील श्रीकांत जी मोघे हे अरविंदजीं चे मित्र होते, त्यामुळे शांतनु ची भेट झाली ,त्याला त्यांनी आशीर्वाद दिले, सुलभा देशपांडे यांची आठवण काढली आणि त्यांचा चिरंजीव निनाद देशपांडे तोही काल शूटिंग करत होता ,त्याची भेट झाली,
मग अश्विनी महांगडे, गौरी कुलकर्णी ,अभिषेक देशमुख ,निरंजन कुलकर्णी ,सगळ्यांशी छान गप्पा झाल्या. सायली संजीवनं बाबांच्या आठवणीत तयार करून घेतली खास गोष्ट, फोटो पोस्ट करत म्हणाली काल मला तो दिवस आठवला तीस-पस्तीस वर्षांपूर्वी माझा हात धरून गोविंद सरया यांच्या चित्रपटाच्या सेटवर माझे वडिल मला घेऊन गेले होते ,सिनेमाचं नाव होतं “वक्त से पहले ” खूप घाबरलो होतो, एक्टिंग, सिनेमा काय असतं काहीच माहिती नवतं, ( still I’m unaware) माझ्या वडिलांनी त्यांचे पोलिस खातं जीथे, खूप खडतर प्रवास आहे त्या मार्गावर मला न पाठवता,या चंदेरी दुनियेचा मार्ग त्यांनी मला दाखवला, वेगळंच विश्व होतं, या विश्वा ची त्यांनाही कल्पना नव्हती पण पोलीस खात्यापेक्षा नक्कीच चांगलं जग असेल याची त्यांना खात्री होती,